Sankalp Hindu Times

March 7, 2026

देश

संयुक्त प्रसाद मित्र मंडळातर्फे शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संयुक्त प्रसाद मित्र मंडळ, नारायण पेठ, पुणे यांच्या वतीने फाल्गुण कृष्ण तृतीया, शके १९४७, शुक्रवार दिनांक ६ मार्च २०२६ रोजी “शिवजन्मोत्सव सोहळा” मोठ्या उत्साहात आणि भव्य प्रमाणात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध युवा शिवव्याख्याते मा. श्री. सर्वेशजी मेहेंदळे यांचे प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. “शिवचरित्र – शिवराय म्हणजे संकल्प, समर्पण, बलिदान, शौर्य आणि स्वाभिमानाचा रोमांचकारी इतिहास” या विषयावर त्यांनी प्रभावी भाषण केले. त्यांच्या ओजस्वी शब्दांनी उपस्थित शेकडो शिवभक्त भारावून गेले. कार्यक्रमादरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.यावेळी स्वस्तिक सोशल फाउंडेशन संचलित गोशाळेसाठी निधी देऊन सामाजिक बांधिलकीही जपण्यात आली. कार्यक्रमास प्रभाग क्रमांक २५ मधील नवनिर्वाचित नगरसेवक मा. राघवेंद्र बाप्पू मानकर, सौ. स्वप्नाली पंडित तसेच सौ. स्वरदाताई बापट आणि कसबा अध्यक्ष अमितजी कंक उपस्थित होते.तसेच विश्रामबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. प्रदीप कसबे यांनी मंडळाला भेट देऊन मंडळाच्या सामाजिक व सेवाभावी कार्याचे कौतुक केले.वक्ता परिचय राधेय डिंगरे यांनी करून दिला. तसेच मंडळाचे कुणाल आहेर, संदीप उभे, सुनील मोहिते, प्रणित शिंदे व निखिल हजारे यांनी शिवव्याख्याते सर्वेशजी मेहेंदळे यांचा शाल, श्रीफळ, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा व फळांची टोकरी देऊन सत्कार करण्यात आला.शिवजयंती निमित्त मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला व निबंध स्पर्धेतील विजेत्यांना मा. नगरसेवक राजेशजी येनपुरे, उद्योजक विनोद शेठ साखला, विशालजी आढाव, रोहितजी महाजन व इतर मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.यावेळी राधिका डिंगरे, वेदांत सुतार, अंशुल मोहिते, देवेश गायकवाड, श्रेयस डिंगरे व इतर बाल कार्यकर्त्यांनी लाठी-काठी खेळ तसेच पोवाडा सादर केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. दीपक उभे यांनी केले तर आभार प्रदर्शन गुरुदत्त डिंगरे यांनी केले.अजित परांजपे ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष संयुक्त प्रसाद मित्र मंडळ या नारायण पेठ, पुणे व कार्यक्रमाला परिसरातील नागरिक व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देश

संयुक्त राष्ट्रांच्या महिला आयोगाच्या ७० व्या अधिवेशनात भारतीय स्त्रीशक्तीचा सहभाग

जागतिक स्तरावर महिलांचे हक्क, सक्षमीकरण आणि समानता यांसंदर्भात महत्त्वपूर्ण मानले जाणारे संयुक्त राष्ट्र महिला स्थिती आयोगाचे ७० वे अधिवेशन ९ ते १९ मार्च २०२६ या कालावधीत संयुक्त राष्ट्र मुख्यालय, न्यूयॉर्क येथे आयोजित करण्यात येत आहे. या अधिवेशनात जगभरातील विविध देशांचे प्रतिनिधी, संयुक्त राष्ट्रांच्या विविध संस्था तसेच आर्थिक व सामाजिक परिषदेकडून मान्यता प्राप्त स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.या आंतरराष्ट्रीय मंचावर भारतातील भारतीय स्त्री शक्ती या संस्थेच्या प्रतिनिधींचा सहभाग ही अभिमानाची बाब मानली जात आहे. भारतीय समाजजीवनात स्त्रीशक्तीची भूमिका, संस्कार, सामाजिक बांधिलकी आणि स्त्री सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती या माध्यमातून जागतिक स्तरावर मांडली जाणार आहे.या अधिवेशनात भारतीय स्त्री शक्तीच्या वतीने नयना सहस्रबुद्धे, डॉ. ज्योती चौथाईवाले, निपा शुक्ला, उज्वला करंबेळकर, विशाखा माशंकर, रश्मी सामंत आणि साजी नारायण या प्रतिनिधींचा सहभाग राहणार आहे. या सर्व प्रतिनिधी विविध चर्चासत्रे, संवाद आणि विचारमंथनाच्या माध्यमातून भारतीय स्त्रीशक्तीचे विचार आणि अनुभव आंतरराष्ट्रीय मंचावर मांडणार आहेत.या अधिवेशनाचा प्रमुख विषय “सर्व महिला व मुलींना न्यायप्रवेश सुनिश्चित करणे आणि बळकट करणे” हा आहे. या अंतर्गत सर्वसमावेशक आणि न्याय्य कायदेव्यवस्था निर्माण करणे, भेदभावपूर्ण कायदे, धोरणे आणि पद्धती दूर करणे तसेच महिलांना न्याय मिळविताना येणाऱ्या संरचनात्मक अडथळ्यांवर मात करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा होणार आहे. याशिवाय महिलांना न्यायव्यवस्थेत समान संधी उपलब्ध करून देणे, त्यांचे अधिकार प्रभावीपणे संरक्षित करणे आणि सामाजिक, आर्थिक तसेच राजकीय पातळीवर त्यांचे सशक्तीकरण करणे यावर विशेष भर दिला जाणार आहे.तसेच या अधिवेशनात पुनरावलोकन विषय म्हणून सार्वजनिक जीवनात महिलांचा पूर्ण आणि प्रभावी सहभाग, निर्णयप्रक्रियेत त्यांची भूमिका अधिक सक्षम करणे तसेच महिलांवरील हिंसाचाराचे निर्मूलन करून स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने विविध देशांच्या अनुभवांचा आढावा घेतला जाणार आहे. महिलांच्या नेतृत्वविकासाला चालना देणे, धोरणनिर्मिती प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढविणे आणि सामाजिक न्यायाच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांवरही या अधिवेशनात चर्चा अपेक्षित आहे.भारतीय स्त्रीशक्तीच्या प्रतिनिधींना या आंतरराष्ट्रीय अधिवेशनासाठी निवड झाल्याबद्दल विविध स्तरांतून शुभेच्छा व्यक्त होत असून, जागतिक स्तरावर भारताच्या स्त्रीशक्तीचा आवाज अधिक प्रभावीपणे पोहोचेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Scroll to Top