Sankalp Hindu Times

March 24, 2026

देश

‘शिवराज दिना’निमित्त पुण्यात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रसंगाची आठवण म्हणून ‘शिवराज दिन’ पुण्यात उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. हिंदू महिला सभेच्या वतीने हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.हा कार्यक्रम लाल महाल, पुणे येथे बुधवार, दि. २५ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६ ते ९ या वेळेत पार पडणार आहे. शिवकालीन इतिहासातील शौर्य, धैर्य आणि बुद्धिमत्तेचा संगम असलेल्या शाहिस्तेखानाच्या बोटे कापण्याच्या प्रसंगाच्या स्मरणार्थ हा दिवस ‘शिवराज दिन’ म्हणून साजरा केला जातो. कार्यक्रमामध्ये ‘कथा शिवरायांची’ या विषयावर आधारित देखणा सांस्कृतिक सादरीकरण करण्यात येणार असून, शिवचरित्रातील प्रेरणादायी प्रसंगांद्वारे उपस्थितांना इतिहासाची उजळणी घडवली जाणार आहे. या उपक्रमाचा उद्देश नव्या पिढीपर्यंत शिवाजी महाराजांचे पराक्रम, राष्ट्रभक्ती आणि स्वराज्याची भावना पोहोचवणे हा आहे.आयोजकांच्या वतीने सर्व नागरिकांना या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शिवकार्याची प्रेरणा घेऊन हिंदुराष्ट्र अधिक समर्थ बनवण्याचा संदेश यावेळी देण्यात येणार आहे.

देश

धर्मांतर केल्यास अनुसूचित जातीचा दर्जा रद्द; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माव्यतिरिक्त इतर धर्म स्वीकारणाऱ्या व्यक्तींना अनुसूचित जाती (SC) दर्जा लागू राहणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या निर्णयामुळे धर्मांतर आणि आरक्षणाच्या हक्कांबाबत पुन्हा एकदा व्यापक चर्चा सुरू झाली आहे.सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, एखादी व्यक्ती हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्म सोडून अन्य धर्म स्वीकारते, तर ती अनुसूचित जातीच्या वर्गात राहू शकत नाही. न्यायालयाने नमूद केले की, “धर्मांतर झाल्यानंतर संबंधित व्यक्तीचा अनुसूचित जातीचा दर्जा आपोआप संपुष्टात येतो.”दोन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने दिलेल्या या निर्णयात विशेषतः नमूद करण्यात आले की, ख्रिश्चन धर्म स्वीकारलेल्या दलित व्यक्तीस अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (SC/ST Act) संरक्षण मिळणार नाही. या भूमिकेमुळे कायदेशीर आणि सामाजिक स्तरावर महत्त्वाचे परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनुसूचित जातींच्या आरक्षणाचा लाभ हा ऐतिहासिक सामाजिक अन्याय आणि भेदभाव लक्षात घेऊन दिला गेला आहे. न्यायालयाच्या मते, हा दर्जा विशिष्ट सामाजिक-धार्मिक परिस्थितींशी संबंधित असल्याने धर्मांतरानंतर त्या परिस्थितीत बदल होतो, असे मानले जाते. या निर्णयामुळे धर्मस्वातंत्र्य आणि सामाजिक न्याय यामधील समतोलाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काही तज्ज्ञांच्या मते, धर्मांतरानंतरही सामाजिक भेदभाव पूर्णपणे नाहीसा होत नाही, त्यामुळे अशा व्यक्तींना संरक्षण मिळावे, अशी मागणीही वेळोवेळी करण्यात येत आहे.दरम्यान, या निर्णयामुळे विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांकडून भिन्न प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. काहीजण या निर्णयाचे समर्थन करत आहेत, तर काहीजण यावर पुनर्विचार करण्याची मागणी करू शकतात.कायद्याच्या आणि समाजव्यवस्थेच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात असून, पुढील काळात यावर अधिक सविस्तर चर्चा आणि कायदेशीर प्रक्रिया होण्याची शक्यता आहे.

Scroll to Top