Sankalp Hindu Times

March 27, 2026

देश

“आरटीई कायद्यात सुधारणा करण्याची नागरिक सोशल फाउंडेशनची मागणी”

पुणे  : राईट टू एज्युकेशन ॲक्ट, 2009 मध्ये आवश्यक सुधारणा करून शिक्षण व्यवस्था अधिक समावेशक, न्याय्य आणि प्रभावी करण्यासाठी नागरिक सोशल फाउंडेशनतर्फे विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.  यामध्ये प्रामुख्याने अनुदान, अंतर बदल, अल्पसंख्याक संस्थांना दिलेली सूट यांचा समावेश असल्याची माहिती  नागरिक सोशल फाउंडेशनचे सीए सर्वेश मेहेंदळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.  यावेळी संस्थेचे संचालक प्रीतम थोरवे, अमेय सप्रे उपस्थित होते.  पुढे बोलतान सीए सर्वेश मेहेंदळे म्हणाले, भारतीय संविधानातील कलम 21A नुसार ६ ते १४ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला मोफत व सक्तीचे शिक्षण देणे ही राज्याची जबाबदारी असल्याचे अधोरेखित करत, शिक्षण हा मूलभूत हक्क सर्वांना समानतेने मिळावा, अशी भूमिका संस्थेची आहे.  शिक्षण हा मूलभूत हक्क असल्यामुळे आरटीई  कायदा कोणत्याही अपवादाशिवाय सर्व शैक्षणिक संस्थांवर, अल्पसंख्याक संस्थांसह, समानपणे लागू करावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. धार्मिक शिक्षण देणाऱ्या शाळांना सध्या दिलेली सूट (Section 1(5)) रद्द करून संपूर्ण शिक्षण व्यवस्थेत एकसमान आणि न्याय्य धोरण लागू करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. आरटीई अंतर्गत शाळांना दिले जाणारे अनुदान वेळेत न मिळाल्यास, थकीत रकमेवर व्याजासह पेमेंट करण्याची स्पष्ट कायदेशीर तरतूद करण्याची मागणी करण्यात आली. सध्याचा 1 किमी/3 किमी अंतर निकष शहरांच्या वाढत्या लोकसंख्येनुसार अपुरा ठरत असल्याने, A+, A, B, C, D ग्रेडिंग प्रणालीवर आधारित नवीन निकष तयार करून ग्रामीण व शहरी भागांसाठी स्वतंत्र नियम निश्चित करावेत, असे सुचविण्यात आले.  समाजातील सर्व घटकांनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे आवाहन नागरिक सोशल फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.

देश

“अखिल पुणे शहर रामनवमी उत्सव समिती व समर्थ युवा फाउंडेशनतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न”

पुणे : अखिल पुणे शहर रामनवमी उत्सव समिती ट्रस्ट आणि समर्थ युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि नूमवि वाद्यपथकाच्या सहकार्याने उत्साहात व यशस्वीरीत्या संपन्न झालेआयोजित करण्यात आलेले एकदिवसीय वैद्यकीय आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडले. रामनवमीच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरामध्ये महिलांसाठी स्तन कर्करोग तपासणी, डोळ्यांची तपासणी (मोतीबिंदू/काचबिंदू), दातांची तपासणी, रक्तातील विविध घटकांची तपासणी, कोलेस्टेरॉल तपासणी, रक्तदाब तसेच रक्तातील साखरेची तपासणी अशा विविध सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या. सुमारे १३,५०० रुपयांच्या तपासण्या नागरिकांना विनामूल्य करण्यात आल्या.पुण्यातील पर्वती, कर्वेनगर, मंडई परिसर तसेच पद्मावती येथे आयोजित या शिबिरांमध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला. विविध ठिकाणी रुग्णांची तपासणी करून आवश्यक ते मार्गदर्शनही तज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आले.आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे आणि सर्वसामान्यांना सुलभ वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. आयोजकांच्या या उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले.या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व संबंधित कार्यकर्ते, वैद्यकीय पथक आणि स्वयंसेवकांचे विशेष योगदान राहिले.

देश

सुभाषनगर येथे ‘सकल हिंदू संमेलन’ उत्साहात संपन्न; शि. द. फडणीस यांचा विशेष सत्कार

सुभाषनगर परिसरात आयोजित करण्यात आलेले ‘सकल हिंदू संमेलन’ गुरुवार, दि. २६ मार्च २०२६ रोजी सायं. ६ वाजता उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. “विचार एक – घोषणा एक – हिंदू सारा एक” या ब्रीदवाक्याखाली झालेल्या या संमेलनाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.या संमेलनाचे अध्यक्ष श्री. मोहनराव गुजराथी होते. सूत्र संचालन श्री. दिलीप टिकले यांनी आपल्या ओघवत्या आणि प्रभावी शैलीत कार्यक्रमाचे निवेदन केले. विविध मान्यवरांची ओळख करून देताना त्यांनी संपूर्ण कार्यक्रम रंगतदार केला. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून श्री. सुनील देवधर उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणातून संघाचा शंभर वर्षाचा इतिहास सांगताना, संघाचे संस्थापक प. पू. डॉ . हेडगेवार ह्यांचे चरित्र आणि संघ स्थापने मागील विचार, थोडक्यात सांगितला. स्वयंसेवकांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत संघ कार्य देशाच्या काना कोपऱ्यात पोचवले. कित्येक स्वयंसेवकांनी जीवनाची आहुती दिली त्यामुळे आज संघ जगातील सर्वात मोठी संघटना झाला आहे. हिंदू समाजाच्या एकतेचे महत्त्व अधोरेखित करत सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. संमेलनात संतांचे आशीर्वचन देण्यासाठी श्री. भरतकुमार महाराज यांची उपस्थिती लाभली. त्यांनी अध्यात्मिक विचार मांडत समाजात एकात्मता आणि सद्भावनेचा संदेश दिला.यावेळी मराठीतील ज्येष्ठ व्यंगचित्रकार शिवराम दत्तात्रेय फडणीस (शि. द. फडणीस) यांचा विशेष सत्कार करण्यात आला. आपल्या ठसठशीत आणि लयबद्ध शैलीतून गेली पाच दशके वाचकांना खळखळून हसवणाऱ्या फडणीस यांनी व्यंगचित्रांविषयीचा पारंपरिक समज बदलून टाकला. व्यंगचित्रे म्हणजे केवळ बोचरी टीका किंवा वेडीवाकडी रेखाटने नसून, त्यातूनही सौंदर्य, विनोद आणि सूक्ष्म संदेश व्यक्त होऊ शकतो, हे त्यांनी आपल्या कलेतून दाखवून दिले. विशेष म्हणजे वयाच्या शंभरीतही त्यांचा उत्साह तरुणांनाही लाजवेल असा असल्याचे उपस्थितांनी गौरवोद्गार काढले. कार्यक्रमात विविध मान्यवरांनीही आपले विचार मांडले. श्री.सौरभ कर्डे यांनी शिवव्याख्यानातून इतिहासाची उजळणी केली, तर प्रा. सुधीर गाडे यांनी सामाजिक समरसतेवर मार्गदर्शन केले. तसेच सौ. डिंपल शाह यांनी कुटुंब प्रबोधनावर विचार मांडले.यावेळी कलावर्धिनी डान्स कंपनीच्या सौ. अरुंधती पटवर्धन व त्यांच्या शिष्या ह्यांनी सादर केलेला संघ गीतांवर आधारित भरतनाट्यम नृत्याविष्कार विशेष आकर्षण ठरला. त्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त टाळ्यांचा कडकडाट मिळाला.या संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी सुभाषनगर परिसर सकल हिंदू संमेलन समिती तसेच परिसरातील सर्व प्रमुख सामाजिक व धार्मिक मंडळांचा सहभाग होता. सर्व मंडळांनी एकत्र येऊन केलेला हा पहिलाच कार्यक्रम होता. कार्यक्रमाने एकात्मतेचा आणि सांस्कृतिक जाणीवेचा प्रभावी संदेश दिला

Scroll to Top