Sankalp Hindu Times

Author name: Muktika Watkhedkar

देश

मोतीबाग नगर येथे सकल हिंदू संमेलनास उत्स्फूर्त प्रतिसाद

मोतीबाग नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या सकल हिंदू संमेलनास समाजबंधूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. समाजसंघटन, एकात्मता आणि सकारात्मक परिवर्तनाचा संदेश देणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.संमेलनात पूज्य भावार्थ देखणे यांचे आशिर्वचन लाभले. त्यांनी समाजाने एकत्र येऊन संस्कार, संघटन व सदाचाराचा मार्ग स्वीकारावा तसेच धर्मनिष्ठ जीवन जगण्याचे आवाहन केले.या वेळी अंजली ताई तागडे यांनी ‘पंच परिवर्तन’ या विषयावर सविस्तर विवेचन केले. समाजपरिवर्तनासाठी आवश्यक असलेल्या पाच प्रमुख मुद्द्यांवर त्यांनी प्रभावी मार्गदर्शन केले. तसेच इतिहास संशोधक पांडुरंग बालकावडे यांनी ‘संघाचे शंभर वर्षांचे यशोगाथा’ या विषयावर मार्गदर्शन करत शतकभराच्या कार्याचा प्रेरणादायी आढावा मांडला.कार्यक्रमाचे नियोजन स्थानिक मंडळ व कार्यकर्त्यांनी अत्यंत सुयोग्य पद्धतीने केले.विशेष म्हणजे, सकल हिंदू संमेलन १ ते ३० मार्च दरम्यान पुणे येथे विविध ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मोतीबाग नगर येथील संमेलनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पुणे शहरातील विविध भागांत होणाऱ्या या संमेलनांमध्ये समाजातील सर्व बंधूंनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.सकल हिंदू धर्म जागृतीसाठी राबविण्यात येणारा हा उपक्रम यशस्वी होवो, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

देश

मध्यपूर्वेत तणाव तीव्र: इराण–इस्रायल–अमेरिका संघर्ष उफाळला

मध्यपूर्वेत सध्या Iran, Israel आणि United States यांच्यातील तणाव गंभीर स्वरूप धारण करत आहे. अलीकडील लष्करी कारवायांमुळे संपूर्ण प्रदेशात अस्थिरता वाढली असून आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष या घडामोडीकडे लागले आहे.हवाई आणि क्षेपणास्त्र हल्ले अमेरिका आणि इस्रायलने इराणमधील काही सामरिक आणि लष्करी ठिकाणांवर हवाई व क्षेपणास्त्र हल्ले केल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून देण्यात आली आहे. या कारवायांचा उद्देश इराणच्या संरक्षण यंत्रणा आणि क्षेपणास्त्र क्षमतेला कमकुवत करणे हा असल्याचे सांगितले जात आहे. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे वृत्त आहे. इराणची तीव्र प्रतिक्रिया इराण सरकारने या कारवाईचा तीव्र निषेध नोंदवला आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही कृती आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. तसेच, इराणने आपली लष्करी कारवाई ‘स्वसंरक्षणासाठी’ असल्याचा दावा केला आहे. परिस्थिती अधिक चिघळू नये यासाठी त्यांनी जागतिक संस्थांकडे हस्तक्षेपाची मागणी केली आहे.अमेरिकेची भूमिका अमेरिकेने आपल्या कारवायांना “प्रादेशिक सुरक्षेसाठी आवश्यक” असे म्हटले आहे. अमेरिकन प्रशासनाने आपल्या नागरिकांना मध्यपूर्वेतील काही भागांमध्ये प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. अमेरिकन सैन्य दल उच्च सतर्कतेवर ठेवण्यात आले आहेत. इस्रायलची सुरक्षा चिंता इस्रायलने आपल्या सीमावर्ती भागात संरक्षण व्यवस्था अधिक मजबूत केली आहे. इस्रायली अधिकाऱ्यांनी इराणकडून संभाव्य प्रत्युत्तराची शक्यता व्यक्त केली असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. जागतिक प्रतिक्रिया युरोपियन देशांसह अनेक राष्ट्रांनी तातडीने शांततेचे आवाहन केले आहे. संयुक्त राष्ट्रांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांनी दोन्ही बाजूंना संयम बाळगण्याचे आणि संवादाद्वारे प्रश्न सोडवण्याचे आवाहन केले आहे. तज्ञांच्या मते,हा संघर्ष दीर्घकाळ चालल्यास तेल बाजारपेठ, जागतिक अर्थव्यवस्था आणि प्रादेशिक स्थैर्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.

धर्म

श्रीकृष्ण नीती आजही समाजासाठी गरजेची आणि दिशादर्शक – मयूर भावे

नागरिक सोशल फाउंडेशन तर्फे व्याख्यानमाला संपन्न पुणे  – कृष्ण नीती म्हणजे केवळ भगवान श्रीकृष्णाने कुरुक्षेत्राच्या रणांगणावर सांगितलेले विचार नाहीत तर श्रीकृष्णाचे संपूर्ण जीवन म्हणजेच कृष्ण नेते आहे. त्यासाठी श्रीकृष्णाचे व्यक्तिमत्व समजून घेतले पाहिजे. श्रीकृष्णाचे सर्व गुण आपल्यामध्ये येणे शक्य नाही परंतु त्या पैकी एखादा गुण आपण आत्मसात करू शकतो श्रीकृष्ण विचार हे आजही समाजासाठी गरजेचे आणि दिशादर्शक आहे असे मत ज्येष्ठ विचारवंत मयूर भावे यांनी व्यक्त केले. नागरिक सोशल फाउंडेशन तर्फे आयोजित करण्यात आलेल्या गरज कृष्ण नीतीची या विषयावरील व्याख्यानमालेत मयूर भावे बोलत होते. संस्थेचे वक्ता विभाग प्रमुख दीपक मेहेंदळे, विश्वस्त अमेय सप्रे, प्रीतम थोरवे आदि यावेळी उपस्थित होते. मयूर भावे म्हणाले, आजच्या काळामध्ये असलेला हिंसेचा अर्थ हा श्रीकृष्णाचा विचार नाही. श्रीकृष्णाचा हिंसेचा विचारवेगळा आहे. समाजाच्या हितासाठी आवश्यक असणारी हिंसा ही हिंसा ठरत नाही तर तो पराक्रम ठरतो हेच आपण महाभारतातून शकतो. आजच्या काळामध्ये अहिंसेचा चुकीचा अर्थ लावला जात आहे परंतु श्रीकृष्णाचे जो पराक्रमाचा विचार आणि शिकवण आहे ती आजच्या पिढीपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.भूतकाळाचे विस्मरण होऊ न देता आणि भविष्याचा वेध मनामध्ये ठेवून वर्तमान काळ आपल्या हातातून निसटू न देणे म्हणजेच श्रीकृष्ण नीती आहे. श्रीकृष्ण नीती ही कृतीपेक्षा उद्देशाला महत्त्व देते. त्यामुळे आपला उद्देश हा कायम चांगला आणि देशाप्रती योग्य ठेवला पाहिजे. श्रीकृष्ण नीती आपल्या प्रत्यक्ष आयुष्यामध्ये अंगीकारून आपण सकारात्मक विचार मनामध्ये ठेवून देशासाठी काय करू शकतो याचा विचार प्रत्येक तरुणाने केला पाहिजे. हा विचार जर प्रत्येक तरुणाने आयुष्यामध्ये अंगीकारला तर भारत निश्चितच एक समृद्ध राष्ट्र म्हणून उदयास येऊ शकेल असेही मयूर भावे यांनी यावेळी सांगितले.अमेय सप्रे म्हणाले, व्याख्यानमालेच्या निमित्ताने राष्ट्र प्रथम हा विचार तरुण पिढीपर्यंत पोहोचावा यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी संस्थेच्या या कार्यामध्ये सहभागी व्हावे यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. भक्ती शक्ती उपक्रमाच्या माध्यमातून प्राचीन मंदिरांचा इतिहास समाजासमोर यावा यासाठी आम्ही कार्य करीत आहोत, तसेच बेटिंग अँप वर बंदी घालून आजच्या तरुणांचे भविष्य सुरक्षित करावे यासाठीही संस्थेने पुढाकार घेतला आहे.भारतीय संस्कृती ही श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या विचारधारेवर उभी आहे. श्रीराम हे आदर्शवादी आहेत तर श्रीकृष्ण हे वास्तववादी आणि व्यवहारावादी आहेत. या दोन्हींचा विचार देशासाठी गरजेचा आहे. देश खऱ्या अर्थाने एक बलशाली राष्ट्र म्हणून उदयास यायचे असेल तर या दोन्ही विचारधारा आजच्या तरुणांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे. नागरिक सोशल फाउंडेशन अशा प्रकारे प्रयत्न करत आहे हे निश्चितच कौतुकास्पद आहे अशी प्रशंसा मयूर भावे यांनी यावेळी केली.सायली गोडबोले जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर पुष्कर सप्रे यांनी आभार मानले.

Scroll to Top